असा घडला भारत | Asa Ghadala Bharat

स्वतंत्र भारताच्या ६५ वर्षांच्या (१९४७ ते २०१२) वाटचालींचा, घटनांचा आणि घडामोडींचा सर्वांगीण मागोवा घेणारा मराठीतील एकमेव महाग्रंथ.
असा घडला भारत
पाचवी आवृत्ती । डबल क्राऊन – A4 आकार । ९२४ पाने । पुठ्ठा बांधणी । कृष्णधवल छायाचित्रे । २.३ किलो वजन
संपादन : मिलिंद चंपानेरकर । सुहास कुलकर्णी
मुळ किंमत : १६९०/-
सवलत किंमत : १७००/- मध्ये घरपोहोच.

अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने १५ ऑगस्ट १९४७ नंतर वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे.
# स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या ?
# पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं?
# अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले ?
# कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली ?
# आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या ?
# चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं ?
# क्रीडाविश्वात काय बदल घडले ?
अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !

1,700.00

Quantity